समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र

समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र समर्थ रामदास स्वामींचे पत्रअखंड सावधान असावें दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें एकांत स्थळी १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी अंतर्यामीं २॥
मागील अपराध क्षमावे कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे कामाकडे ३॥
पाटवणी तुंब निघेना तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना कळलें पाहिजे ४॥
जनाचा प्रवाह चालिला म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला म्हणजे खोटां ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें गलिमांसी
ऐसें सहसा करूं नये दोघे भांडतां तिसर्यासी जय।
धीर धरोण महत्कार्य समजून करावें
आधींच पडला धास्ती म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं बुद्धि शोधावी
राजी राखितां जग मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग समाधान राखावें
आधीं गाजवावे तडाके मग भूमंडळ धाके।
ऐसें होतां धक्के राज्यास होती १०
समय प्रसंग ओळखावा राग निपटून काढावा।
आला तरी कळों द्यावा जनांमध्यें ११
राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक उपजोंचि नये १२
आहे तितुकें जतन करावें पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें जिकडे तिकडे १३
लोकीं हिंमत धरावी शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी पावाल येणें १४
शिवराजास आठवावें जीवित्व तृणवत्

~ by manatala on जुलै 25, 2007.

तुमचा अभिप्राय नोंदवा